व्यापार्‍यांच्या जमीनीवर तालुक्यात ताबेमारी व्यापार्‍यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट

अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-नगर तालुक्यात जमिनी घेतलेल्या शहरातील व्यापार्‍यांच्या त्या जमीनीवर ताबेमारी करण्यात येत असल्याचा प्रकार आता समोर आला आहे.

त्यामुळे व्यापारी बांधवांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.नगर शहरातील व्यापार्‍यांच्या जमिनीवर नगर तालुयातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी,विजय वालचंद गांधी बाबुर्डी येथे सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोजपणे पाल टाकण्यात आले आहे.

त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली.यावेळी आमदार संग्राम जगताप, जयेश पोखरणा,पिंटू कटारिया,कमलेश भंडारी,दिनेश संकलेचा, रोहन बोरा,संदीप बोरा, गणेश बुरा,नितीन शिंगवी,रितेश सोनीमडलेचा,सचिन छाजेड,मनीष लोढा, ईश्वर बोरा,दिनेश संकलेचा,भरत गुरुनानी, पराग मानधना आदीसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *